10वी 12वी शिष्यवृत्ती 2025: पात्र विद्यार्थ्यांना मिळणार ₹10,000 – अर्ज करण्याची अंतिम संधी आजच!

आज आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 10,000 रुपये शिष्यवृत्ती कशी मिळणार आहे. यासाठी अर्ज कसा करावा लागेल, कोण पात्र आहेत, अर्ज ऑफलाईन करायचा की ऑनलाईन, याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

10वी 12वी शिष्यवृत्ती – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे – जर तुम्ही यावर्षी 10वी किंवा 12वीची परीक्षा दिली असेल आणि यामध्ये पास झालेला असाल, तर सरकारकडून 10,000 रुपये आर्थिक मदत म्हणून मिळू शकतात.

ही शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी उपयोगी ठरेल. आता बघूया यासाठी कोण पात्र आहे, अर्ज कसा करावा लागतो आणि ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात कशी जमा होणार आहे, याची सविस्तर माहिती.

कोण आहेत पात्र विद्यार्थी?

या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या मुलांनाच मिळतो. ही योजना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवली जाते. जर कोणताही विद्यार्थी 10वी किंवा 12वीमध्ये 50% पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाला असेल आणि त्याचे पालक बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असतील, तर त्याला या योजनेअंतर्गत 10,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळू शकते.

निकाल जाहीर होण्याची तारीख

2025 मध्ये महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला होता, तर 10वीचा निकाल 13 मे रोजी लागला. या दोन्ही परीक्षांमध्ये राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहेत. त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

योजना काय आहे?

ही योजना म्हणजेच दहावी-बारावी शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना, ही महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना, जर त्यांनी 10वी किंवा 12वीमध्ये 50% पेक्षा अधिक गुण मिळवले असतील, तर त्यांना थेट बँक खात्यात 10,000 रुपये दिले जातात.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता अटी

  1. अर्जदाराचे पालक बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे.
  2. ते कामगार महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत सदस्य असावेत.
  3. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  4. 10वी किंवा 12वीमध्ये किमान 50% गुण मिळवलेले असावेत.
  5. ही शिष्यवृत्ती एका कुटुंबातील केवळ दोन मुलांपर्यंत मर्यादित आहे.

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी संबंधित बांधकाम कामगारांच्या पालकांनी कल्याणकारी मंडळाकडे संपर्क साधावा. काही वेळा हे अर्ज ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध असतात, तर काहीवेळा ऑफलाईन स्वरूपात मंडळाच्या कार्यालयात जाऊन सुद्धा करता येतात. अर्ज करताना मुलाचा निकाल, गुणपत्रक, आधार कार्ड, बँक खाते तपशील, आणि पालकांचे बांधकाम कामगार प्रमाणपत्र लागते.

Leave a Comment